Pragyanand Saraswati Ji Maharaj on Pahalgam : पहलगाममधील घटना म्हणजे थेट हिंदू धर्मावरील हल्ला
ज्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्या हिंदू धर्माच्या अनुयायींना त्यांचा धर्म विचारून मारले जात आहे, हे दुर्दैवी असून याचा विचार करा असे मत शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केले आहे... पहलगाम मधील घटना थेट धर्मावर हल्ला असून ज्या हिंदू धर्मामुळे भारत भूमी ओळखली जाते, त्या हिंदू धर्मावर हा हल्ला असल्याचे ही शंकराचार्य म्हणाले... ज्या औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्याच औरंगजेब चे वंशज आज कट्टरपंथी आणि दहशतवादी म्हणून हिंदू धर्मियांवर हल्ले करत आहेत.. त्यामुळे आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेब ची कबर कायमची हटवावी... जर महाराष्ट्रातून औरंगजची कबर सरकार हटवणार नसेल तर सनातन हिंदू धर्मियांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असा इशारा ही त्यांनी दिला... पहलगाममध्ये हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याशी आम्हाला सूड नको, तर त्यांना दंड द्यायचा आहे... सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा ही आमची अपेक्षा असल्याची शंकराचार्य म्हणाले... दरम्यान, जे नेते पहलगाम मधील दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असे खोटे दावे करत आहे, त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला आहे असे सांगत शंकराचार्य यांनी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांचाही चांगलाच समाचार घेतला.. काही मतांसाठी असे नेते धार्मिक दहशतवादाला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला... सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही,तर सरकारसोबत उभे राहण्याची आहे असे ही ते म्हणाले.. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी....