¡Sorpréndeme!

Sangli Vivek Shinde UPSC : सांगलीचा पठ्ठ्या झाला IPS अधिकारी! विवेक शिंदेची प्रेरणादायी कहाणी..

2025-04-24 3 Dailymotion

Sangli Vivek Shinde UPSC : सांगलीचा पठ्ठ्या झाला IPS अधिकारी! विवेक शिंदेची प्रेरणादायी कहाणी..

 जे काय करताय त्यात पूर्णपणे करा, यूपीएससी हाच एक सक्सेसचा रूट नाही, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात जर तुम्ही 100% काम केलं तर तुम्ही खरोखरच देशाच्या विकासासाठी योगदान करताय हेच माझं त्यांना सांगायच. यूपीएससी परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर घाट मात्यावरील बेनापूर गावचे सुपुत्र विवेक शिंदे यांनी आयपीएस पदाला गवसणी घातलेली आहे. आपल्या सोबत स्वतः विवेकजी शिंदे आहेत एकतर सुरुवातीला खूप अभिनंदन ज्या भागातून तुम्ही आलाय एक दुष्काळी भाग खानापूर घाट माता. देशभर काढणार गाव म्हणून ओळखलं जातं. या क्षेत्राकडे वळावं हे तुम्ही कधी ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने कशी तयारी केली? सुरुवातीपासूनच माझ्या चुलते असतील, माझे वडील असतील त्यांनी भरपूर अधिकाऱ्यांना या क्षेत्रात काम केलेलं बघितलं होतं. हा दुष्काळी भाग होता. त्यावेळेस इथले जे कलेक्टर होते, त्यांनी आपल्या बंधाऱ्याचं काम असेल, ह्या भागात पाणी कसे येईल यासाठी खूप प्रयत्न केले होते. तेव्हापासूनच इन्स्पिरेशन मिळालं. तसच मी रोहतकमध्ये आमचं गलाईच दुकान आहे. तिथे आयपीएस जाधव सर आहेत. श्रीकांत जाधव सर आहेत तर त्यांनीही खूप इन्स्पिरेशन दिलं मी दहावेत होतो तेव्हाच त्यांना भेटून वगैरे त्यांनी इन्स्पिरेशन दिलं मग कुठेतरी भविष्यात हे करायचं हे ठरवलं आणि आता हे शक्य झालं. कशा पद्धतीची तयारी होती म्हणजे तुम्ही एकतर लहानपणापासूनच हेय ठरवलं होतं की आपण आयपीएस किंवा स्पर्धाच परीक्षा द्यायचं तर तेव्हापासूनचा प्रवास ते आज पदाला गवसणी घालण्यापर्यंत प्रवास हे कसा प्रवास माझा प्रवास तसा यूपीएससीचा हा शेवटच्या वर्षापासून जो ग्रॅज्युएशनचा शेवटचा वर्ष असतं तेव्हापासून सुरू झाला त्याच्यात माझं आयआयटी गोवाहाटी मधून ग्रॅज्युएशन झालं त्यामुळे माझं पहिलं प्रिपरेशन फेज होता तो आयआयटी साठीच गेला. लास्ट इयर मध्ये मी निर्णय घेतला की आता यूपीएससी करावं मी प्लेसमेंटलाही सुद्धा बसलो नाही आणि 23 ला पहिल्यांदा मी अटेम्प्ट दिला. त्यात माझं फायनल सिलेक्शन दोन मार्कानी राहिलं इंटरव्यू सुद्धा दिला होता पण त्यात सिलेक्शन झालं नाही आणि हा दुसरा अटेम्प्ट होता यात झालं सिलेक्शन. कुटुंबाची साथ कशी भेटली कारण अखं कुटुंब सोन्या चांदीच म्हणा किंवा व्यावसायिक सगळे तर यामध्ये तुम्हाला एक वेगळं क्षेत्र तुम्ही निवडावं यामध्ये कुटुंबा कशी? माझ्या वडिलांची असेल किंवा चुलत्यांची आधीपासूनच मुलांना शिक्षण चांगल्या प्रकारच द्यावं यासाठी त्यांचा प्रयत्न होता. माझ्या बहिणी असतील किंवा माझे भाऊ असतील सगळ्यांच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल आहे. सगळ्यांना काय त काय त टार्गेट होत तसच मला पण हे यूपीएससी च आधीपासूनच टार्गेट होतं आणि ते आज पूर्ण झालं याचा मला अभिमान आहे.. .