Sanjay Raut : भाजपने क्रेडिट घ्यायला 'राणा'ला भारतात आणलं का? तर मग पुलवामाचे क्रेडिट घ्या
मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला. या आधीही अबू सालेमला भारतात आणलं गेलं तेहीही कायदेशीर प्रक्रियेनेच. तसेच या तहव्वूर राणाचं आहे. त्याचा फेस्टिवल करू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावं असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, राणाला भारतात आणलंय पण क्रेडिट का घेताय? देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवांना परत आणा. मेहूल चोक्शी, निरव मोदीला घेऊन या. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात. ज्या दिवशी टॅरिफ लावलं त्या दिवशी यांनी वक्फ बिल आणलं. आता बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणिदेशात राणा फेस्टिवल घेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला.