रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. शरद पवारांचं सर्व आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे, त्यामुळे शरद पवारांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ लावावं असं सदाभाऊ खोत म्हणाले.