विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून यावेळी सरकारकडून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारने विधानसभेत दिली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही अशी विचारणा करताना नेमकं राज्यात चाललयं काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.