उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात रविवारी ३ ऑक्टोबरला हिंसाचाराची घटना घडली. टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिसाचारानंतर लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला. तसेच तणाव निर्माण झाल्याने जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांकडून भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे
#LakhimpurKheriviolence #FarmerProtest #AjayMishra #lakhimpurkhiri #PriyankaGandhi #BJP