देशातील प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे हे सहावे वर्ष, म्हणजे अर्धे तप झाले. यानिमित्ताने "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या 'एज्युकॉन' उपक्रमाचे अवलोकन करणे सार्थ होईल, असे वाटते. दर वर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशांत ही सभा घेतो. त्यानिमित्ताने नवीन देशांचाही काही प्रमाणात परिचय होतो. साहजिकच आपण आपल्या देशांत काय करायला हवे, काय नको, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दृष्टीकोन याचे आपोआपच विवेचन होते.