सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज(18 ऑक्टोबर) साताऱ्यात जोरदार पाऊस सुरू असताना सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले "चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे", असे पवार म्हणाले सभा सुरू असताना पाऊस पडू लागला, मात्र शरद पवार यांनी भाषण न थांबवता भर पावसात कार्यकर्त्यांचे संबोधन सुरुच ठेवले त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले